तीन तिनदा तिहाई
शेवटी हाती काही लागतच नाही
मराठी असो वा हिंदी, मालिका कोणतीही
आमची कथा पुढे, कधी सरकतच नाही
पूर्वी प्रत्येक सिन, तिनदा दाखवला जाई
आता तिहाईचीही करतात तिहाई
पूर्वी एकच पात्र, एकच जोडपं, चालून जाई
आता तेही तीन घेतल्याविना, मालिकाच नाही
कॅमेरा डावीकडून उजवीकडे जाई
तसाच परत उलटा येई
वरुन खाली खालून वर, आणि सतत तिरका जाई
हे तासन्तास बघून आम्हाला चक्कर कशी येत नाही
कौटुंबिक मालिका, आणि रिऍलिटी शो
याशिवाय वेगळं, आता काही दिसतच नाही
चॅनेलवाल्यांची कमाई, घराघरात बघते प्रत्येक बाई
ताई आई आजीबाई, मालिका बघण्यात मग्न होई
अजूनही याला अपवाद आहेत, नाही असं नाही
पण फक्त अपवादापुरतं असणं, फार चांगलं नाही
-वीरेंद्र देशपांडे २००८
वाचव देवा
6 days ago

4 comments:
chan...
sahi ......chaayla kantalun jaato baghnaara...
dhisssssh......dhisssssh ......dhissssh karat pakvun taaktaat lekache
अजूनही याला अपवाद आहेत, नाही असं नाही
पण फक्त अपवादापुरतं असणं, फार चांगलं नाही
fantastic
perrrrrrrrrfect! हाण्लंस गड्या.
Post a Comment