Sunday, December 6, 2009

आता वाटतं...

आता वाटतं सुटावेत अलगद नकळत हात
जशी सहजच सुटे सुरगाठ, पण आहे ती निरगाठ

कसा विसरणार तिचा स्पर्श, तिचा गंध, पहिली मिठी
पावसात चिंब भिजलेली अन्‌ थरथर माझ्या ओठी

हसता हसता कधी आठवेलंच ना तिचा हसरा चेहरा
रडता रडता आठवेलंच ना अश्रूंनी भिजलेला खांदा

प्रत्येक क्षण तिच्याच नावावर, प्रत्येक श्वासात तिचाच उष्ण श्वास
हे क्षण परत कसे फेडू? हे श्वास परत कसे सोडू?

नाळ जेव्हा तुटते, नाते जेव्हा मिटते, तेव्हा काय वाटते?
मायेची अंथरलेली चादर फाटते

एका क्षणापूर्वी आपलं सर्वस्व असलेलं कुणी
दुसर्‍या क्षणी आपलं कुणीच उरत नाही

-वीरेंद्र देशपांडे ०६/१२/२००९

3 comments:

Anonymous said...

very nice

prachi said...

Very good poem... :) Keep up the good work.

goavanee said...

एका क्षणापूर्वी आपलं सर्वस्व असलेलं कुणी
दुसर्‍या क्षणी आपलं कुणीच उरत नाही
----
एका क्षणापुरते हसू, नंतर दाटलेल पाणी
त्यात भिजली संध्याकाळ, सरता सरत नाही