अता नको नवी पालवी नको हिरवे पान
माणूस म्हणून आयुष्याकडून हरल्याचे भान
त्यापेक्षा मोहातून सोडवून घ्यावा आत्मा
गुंतण्याआधी कोठे जीव ध्यावा परमात्मा
मन गुंतवण्यापेक्षा हात गुंतवणे खरे
ह्रुदय जुळवण्यापेक्षा शब्द जुळवणे बरे
नव्या म्रुगजळांपेक्षा जुनी वाळवंटे खरी
अंधूक सुखापेक्षा स्पष्ट दु:खे बरी
नको नव्या आशा पुढे दारूण निराशा
काहीच नसते शाश्वत, अशाश्वत निराशा
दु:ख कसे आपले हक्काचे असते
त्याला तरी निदान कवटाळून बसता येते
दैव ही न होते माझे कर्महि न होते
प्राक्तनाचे भोग अन् पाप माथी होते
कुणाकडे आता उ:शाप हे मागायचे
जन्मलो त्याचेहि पश्चात्ताप व्हायचे
- वीरेंद्र देशपांडे १४/०१/२०१०
खिचीक - गॉन केस
4 days ago

3 comments:
Tooo good :)
एकदम छान लिहिली आहे कविता आणि सुरुवातीच्या काही ओळी तर विशेष आवडल्या.
"नव्या म्रुगजळांपेक्षा जुनी वाळवंटे खरी
अंधूक सुखापेक्षा स्पष्ट दु:खे बरी"
…. सोप्या शब्दात वास्तव मांडलय ..... आवडल
Post a Comment